एकाचा प्रश्न ....
*हिंदुत्व म्हणजे काय? विज्ञान युगात याचा काय उपयोग?*
माझे उत्तर ....
हिंदुत्व ही उच्चमुल्याधिष्ठीत जीवन प्रणाली आहे. ह्यात उत्तम कर्म, ध्येय निष्ठा, निसर्गानुसंधान साधून प्रगती, विचार व नीतिमुल्य, सात्विकता, अदांभिकपणा, सदाचार ह्या व अश्या अनेक तत्वांचा समावेश होतो.
विज्ञानयुगात तर ह्या सर्व तत्वांची सर्वात जास्त निकड आहे.
विज्ञानातून प्रगती साधत असताना निसर्गाचा समतोल ढासळू न देणं, निसर्गाचे केवळ दोहन करणं आणि शोषण न करणं हे केवळ ह्या नीति मुल्यांमुळेच शक्य आहे.
विज्ञानाचा वापर करुन विनाशाकडे न जाता मानव उद्धाराकडे जावा असे वाटत असेल तर ही नीति मुल्येच कामाला येतील.
No comments:
Post a Comment