आम्ही चांगली कर्मे करून सुद्धा आमचे भोग सरत नाहीत आणि उघड पापे करून सुद्धा काही माणसे निवांत जगतात असे का, ह्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर ...
हे गणित इतकं सोपं नाहीये.
श्रीमद्भगवदगीता ह्याचे सविस्तर उत्तर देते.
अश्या वेळी आधीची पुण्याई खर्च होत असते. आणि वर भर पडते ती पाप कर्मांची.
ज्या क्षणी आधीची पुण्याई संपेल त्या क्षणी भोग सुरू होतात. मग भले ते ह्या जन्मी असो अथवा पुढील जन्मी.
आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा परिपाक म्हणून उत्तम अथवा अधम भोग भोगावेच लागतात.
एक उदाहरण देतो.
समजा तुमच्याकडे एक मोठी कणगी अथवा बळद (धान्य साठवायचे खूप मोठे भांडे) आहे. त्यात वरून धान्य ओततात आणि खालून धान्य काढतात.
तुम्ही त्यात पूर्ण भरेल एवढी ज्वारी वरून ओतली. आणि खालून त्यातली रोज थोडी थोडी काढू लागलात.
थोड्या दिवसाने भांडं अर्ध संपलं. खालून ज्वारी काढणं सुरूच राहिलं. पण आता तुम्ही वरून त्यात ज्वारी ऐवजी बाजरी ओतलीत.
तर काय होईल?
खालच्या बाजूने लगेच तुम्हाला बाजरी काढता येईल का? नाही.
बाजरी बाहेर यायच्या आधी, तुम्ही आधीच ओतलेली ज्वारी संपावी लागते. ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुमच्या मनात नसले तरी बाजरीच बाहेर पडेल.
तसेच कर्माचे असते. आधी उत्तम कर्म केले म्हणून चांगले भोग आले आहेत पण त्यात भर घालण्याऐवजी त्यांनी वाईट कर्म केले. आता ते ही भोगावेच लागेल.
No comments:
Post a Comment