Copy paste
ll श्रीराम समर्थ ll
*साधकाने टाळायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे* :-
१) रिकामा वेळ मिळाल्यास तो क्षुल्लक गोष्टींबद्दल विचार करण्यात, क्षुल्लक वासना तृप्त करण्यात किंवा मनोराज्ये करण्यात घालवू नये.
२) साधनात कधीही आळस नसावा.
३) स्वतःच्या योग्यतेबद्दल भलतीच कल्पना नसावी.
४) अनुभवांच्या मागे लागू नये; त्यांच्याविषयी अधीर होऊ नये. आतून तयारी झाली की अनुभव मागे लागतो.
५) नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावे, जिज्ञासेने नसावे, दर्शनासाठीसुद्धा नसावे.
६) आपले साध्य उघड्यावर टाकू नये. त्याला दृष्ट लागते. त्याचा परिणाम वाईट होतो.
७) साधकाने आपणहोऊन व्यवहाराची मर्यादा सोडू नये.
८) गुरूने दिलेल्या नामाबद्दल आपली अक्कल चालवू नये. आपल्या प्रगतीबद्दल गैरसमज कधी न करून घ्यावा, कारण आपल्या अंतरंगात काय भरलेले आहे आपल्यालाच माहीत नसते.
९) माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असेही कधी म्हणू नये.
१०) साधन करीत असता लोक आपल्याला काय बोलतात याला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊ नये. दुसऱ्या साधकाविषयी आपले मत देऊ नये. त्याला वाईट तर म्हणूच नये.
११) स्वतःबद्दल फार बोलू नये. अहंकाराच्या आहारी जाऊ नये.
भक्तीचे मर्म हे आहे की बाहेरून सगळे तसेच चालले तरी आतून भगवंताखेरीज सर्वांतून सुटले पाहिजे!!!
~~ (पूज्य बाबा बेलसरे- परमार्थप्रदीप).
No comments:
Post a Comment