Sunday, 26 March 2023

राहुल का पाखंड

 जी नही राहुलजी, 

आपको हम सावरकर नही समझ रहे क्यूकी- 


-सावरकरजी नाकी सिर्फ जन्मसे बल्की आपने कर्म और विचार से भी ब्राह्मण थे, जो कभी जात-पात भेदभाव को नही मानते थे और आप हो के चुनाव के लिये ब्राह्मण बनने का ढोंग करके शर्ट के ऊपर से जनेऊ पहनते हो. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है ?


सावरकर जी महान कवी और सुविख्यात लेखक थे. उनके महाकाव्य, नाट्यलेखन, और गीत सुविख्यात है.  उधर आपको एक पॅरेग्राफ भी खुदका लिखना नही आता. बना बनाया कॉपी-पेस्ट करके लिखपढ लेते हो. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है ?


- सावरकरजी एक महान वक्ता थे और आपको unfortunately का शब्दप्रयोग कैसे करे ये भी कानमे बताना पडता है. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है? 


- सावरकरजी पुरी दुनिया मे एक मात्र ऐसे इंसान थे जिनको दो काला पानी की सजा एक साथ मिली थी, जहा ज्यूट के कपडे पहनने पडते थे और दिनभर पसीनेसे लतपत होकर परिश्रम करना पडता था. 

उधर आप हो के चार कदम चलने पर आपकी सेवा मे AC गाडी आती है. आप सिर्फ ब्रँडेड कपडे पहनते हो. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है?


- सावरकरजी असीम बुद्धिमत्ता के धनी थे. अपार मेहनतसे उन्होने ज्ञान कमाया था और जो कमाया था वो सिर्फ और सिर्फ देशसेवा और समाज सुधारणा के लिए उपयोग मे लाया. उधर, आपकी बुद्धिमत्ता के बारे में कुछ ना कहा जाये तोही बेहतर होगा. आपको जो भी ज्ञान प्राप्त हुआ है वो आप भारत देश को कमजोर करने के लिये, बदनाम करने के लिये, तोडने के लिए इस्तेमाल करते हो. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है?


- सावरकरजी का पूरा परिवार देश के लिए समर्पित था. अपनी जान हथेली पे रख के, अपने संसार, मोहमायाका त्याग करके उन्होने देश सेवा राष्ट्रभक्ती के लिए सर्वोच्च बलिदान दिया था. और आप हो के बँकॉक जाने के अलावा अपनी comfort zone से बाहर भी नही निकलते. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है ?


-  सावरकरजी जब ब्रिटन मे थे तो उन्होने अपना समय भारत माँ के मुक्ती के लिये दिया था. वे जहाँभी जाते , भारतमाता का गुणगान करते. भारतमाँ की याद आने पर उन्होने एक भाव विभोर गीत लिखा था "ने मजसी ने". उधर आप हो के उसी ब्रिटन मे जाकर भारतमाँ की बदी करते हो, अवमान करते हो, निंदा करते हो, हमे शर्मसार महसूस कराते हो. तो आप और सावरकरजी एक कैसे हो सकते है? 


लिखने के लिए तो खैर बहुत ज्यादा है लेकिन फिलहाल इतना ही.


इसलिये सावरकरजी भारतरत्न, स्वातंत्र्यसूर्य, थोर समाजसेवक, क्रांतिकारी, देशभक्त है और राहुलजी आप किराये से लिये गांधी नाम के नामधारी गांधी हो. 


सचिन श्रीकांत भिडे

रमजान व हिंदू

 कुठल्याही नकारात्मक अथवा पूर्वग्रहदूषित कमेंट्स लिहायच्या आधी एक तर लेख पूर्ण वाचा, समजून घ्या आणि इतकेच ध्यानात ठेवा की हा लेख भगवान परशुरामाच्या अवलादीने लिहीलेला आहे. 


आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सांगितले आहे की प्रत्येकाकडून काही ना काही चांगले शिकण्यासारखे असते व ते जर आपण घेतले व आपल्या धर्माला अनुरूप असे त्याला रूप दिले तर आपला धर्म अजून जास्त बळकट होऊ शकतो. त्या अनुषंगाने हा लेख मी लिहीत आहे.


रमजान मुबारक -----


आजपासून इस्लामचा पवित्र असा रमजान महिना सुरू होतोय. आजचा दिवस ते रमजान ईद असा साधारण 28 दिवसाचा कालावधी व ईदनंतर साधारण 60 ते 70 दिवसाने येणारी बकरीद हा या इस्लाम पंथाचा पवित्र कालावधी समजला जातो.


 या महिन्यात मुस्लिम लोक ज्या पावित्र्याने देवभक्ती व देशसेवा करतात, गरिबांची सेवा करतात त्याला तोड नाही.(आता लगेच याचा अर्थ आपल्या धर्मात असं कोणी करतच नाही का वगैरे म्हणू नका. पण हल्ली आपल्या धर्मात भक्तीपेक्षा तोंड वाजवणं जास्त असतं, ज्याला आळा बसला पाहिजे. द्यायचा एक रुपया आणि फरश्यांवर, भिंतीवर नावे कोरून घ्यायची हे आपल्या धर्मात जरा अति होतंय)


 इस्लाममध्ये गुप्तदान या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. या रमजान महिन्यात 28 दिवसात अब्जावधी रुपयाचे दान दिले जाते व ते दान कोण देतो हे कुणालाही कळत नाही, कारण ते गुप्त असते. हे रमजानचे दान देण्यासाठी लोक वर्षभर दर महिन्याला आपल्या कमाईतून ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवतात. (या पैशाचा वापर जे वाईट मार्गासाठी करतात तो भाग या लेखाचा भाग नाही. यातील उद्देश एकच आहे की यांच्याकडचे जे चांगले गुण, चांगले विचार आहेत ते आपण घ्यायला पाहिजेत.) 


संपूर्ण 28 दिवस ते लोक देवाचे नामस्मरण करण्यात, त्यांचा पवित्र ग्रंथ वाचण्यात, देवाशी संबंधित अशा गोष्टी वाचण्यात, ऐकण्यात घालवतात. दिवसभराचा उपवास करतात. उपवास सुरू करताना व सोडताना देवाच्या नावाने, त्याच्या प्रार्थनेने, कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार सर्वजण एकत्र बसून उपास धरतात व सोडतात. आपल्यामध्ये ही परंपरा व पद्धत लोप पावत चालली आहे. आपण विभक्त होत आहोत व ते एकत्र येत आहेत.

आपणही असे एकत्र येणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक नवरात्री फराळ, सार्वजनिक दिवाळी फराळ असे उपवासाचे अथवा सणांचे निमित्त करून एकत्रीकरणाचे कार्यक्रम आपल्या धर्मात होणे अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून सर्व जातीपंथाचे लोक हिंदू या धर्माछत्राखाली एकत्र येतील व आपल्यातील एकोपा वाढेल. यातील गरजूंना आपल्या समाजातील, आपल्या धर्मातील धनाढ्य लोकांनी एखादा व्यवसाय स्थापन करण्यासाठी मदत करावी, त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, पाय खेचणे थांबवावे.


 ही अशी मदत मुस्लिम पंथांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते. देव धर्मकार्य समाजाच्या उन्नतीसाठी जकात भरणे, आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे, पाच वेळचा नमाज अता करणे ह्या प्रथा ते अतिशय कट्टरपणे अमलात आणतात. 


आपण आपल्या कुलदेवतेला असे नियमाने जातो का, आपल्या पुढच्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देतो का? आपल्या समाजातील किती गरीब कुटुंबांना आपण मदत करतो याचा आपणही  सूक्ष्म विचार केला पाहिजे.


 आपल्या देवाला कोणीही येतं व नावे ठेवून जातं पण त्यांच्या बाबतीत असं होत नाही. कारण त्यांनी आपल्या देवधर्म रक्षणासाठी शपथ घेतलेली आहे, आणि आपण मात्र अतिशय धर्मनिरपेक्ष होऊन जगतो.

 तेव्हा या सर्व गोष्टीतून काहीतरी शिकून आपण आपला धर्म कसा वाचवावा, कसा वाढवावा, कसा पुढे न्यावा, जातीभेद कसा नष्ट करावा, सर्वांनी एकत्र कसे यावे व हिंदू या नावाचा सगळीकडे आदर कसा असावा, एक आदरयुक्त दहशत कशी असावी हे या रमजानच्या काळात शिकण्यासारखे आहे.


आपल्या देवाचे पावित्र्य आपल्या हातात असते. आपल्या धर्माचे रक्षण आपल्या हातात असते.

तेव्हा मुस्लिम पंथाकडून अनेक चांगल्या शिकण्यासारख्या गोष्टी घेऊन आपल्याला अतिशय सबळ होणे गरजेचे आहे व याची नितांत आवश्यकता आहे. 


पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा.


सचिन श्रीकांत भिडे

सावरकर व राहुल गांधी

 "मै राहुल सावरकर नही राहुल गांधी हू". 

"मै माफी नही मांगूंगा"

 "सावरकरजीने कहा था कि मै सदैव आपका नोकर बनने के लिये तय्यार हू'

ही आहेत माजी खासदार श्री राहुल गांधी यांच्या तोंडची श्री विनायक दामोदर सावरकर या थोर क्रांतिकारकाचा अपमान करणारी काही वाक्ये.

 देशाच्या स्वातंत्र्यासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या क्रांतीसूर्य भारतरत्न सावरकरांवर यथेच्छ चिखलफेक करणाऱ्या राहुल गांधी यांचा प्रथम जाहीर निषेध.


'व्हेरी डेंजरस' असे लिहिलेला बिल्ला ज्या कैद्याच्या गळ्यात अडकवून ज्याला अंदमानच्या तुरुंगात साठ वर्षे खितपत ठेवायला धाडले होते ते क्रांतिकारक सावरकर जगातील एकमेव व्यक्ती होते ज्यांना एकदम सलग एकत्र दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. स्वतःच्या संसाराची कुटुंबाची राखरांगोळी झालेली स्वतःच्या डोळ्याने बघूनही एखाद्या अभेद्य तटबंदीसारखा जो माणूस देशसेवेशी एकचित्त राहिला त्या सावरकरांवर लांच्छन लावायची राहुल गांधींची हिंमत होतेच कशी?


 "चिमण्या पाखरांसारखे घरटे बांधून पिले जन्माला घालून वंश वाढवायचा संसार आपल्याला करायचा नाहीये. आपल्याला आपल्या भारतमातेचा विचार करायचा आहे." या शब्दात आपल्या पत्नीला धीर देऊन समजावून सांगणाऱ्या जितक्या हळव्या तितक्याच खंबीर सावरकरांचा अपमान हे गृहस्थ करतातच कसे ?


देशासाठी मार्सेलीसची जगप्रसिद्ध उडी मारणारे वीर सावरकर, अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन करणारे व मंदिरे सर्वांना खुली करणारे समाज सुधारक सावरकर, स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणारे क्रांतीरत्न सावरकर, आपले परिपक्व ओजस्वी तेज:पुंज विचार कारागृहाच्या भिंतीवर कोरून महाकाव्य लिहिणारे थोर विचारवंत व साहित्यिक सावरकर, देश स्वतंत्र झाल्यानंतरही समाज सुधारणेसाठी लढणारे लढवय्ये सावरकर, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा अंत होऊन हिंदू धर्म जातीविरहित व विज्ञाननिष्ठ व्हावा म्हणून झिजणारे हिंदूहृदयसम्राट सावरकर, स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने उपेक्षा केल्याने आता आपले लौकिक कर्तव्य संपले हे स्वीकारून शांतपणे प्रायोपवेशनाने शरीरत्याग करणारे धीरोदात्त सावरकर!

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणे म्हणजे माथ्यावरील सूर्यावर थुंकल्यासारखे आहे व हा अपमान राहुल गांधी यांनी वारंवार केलेला आहे.


 देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्वच शूरवीरांना समान मानवंदना द्यावी हा सरळ साधा विचार असताना, केवळ काँग्रेसच्या विचारांच्या विरोधात असल्याने काँग्रेस पक्ष व त्यातून फुटून बाहेर पडलेले स्थानिक पक्ष व त्यांचे नेते अशा क्रांतीवीरांचा सतत अपमान करत असतात जे अत्यंत चुकीचे आहे व समाजाच्या एकोप्यास बाधा आणणारे आहे.


 आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी हे स्पष्ट सांगितले आहे की सावरकरांचा अपमान हाही एक प्रकारे देशद्रोहच आहे.


अशा थोर क्रांतिकारकाचा अपमान हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे, मराठी जनतेचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे, समस्त हिंदूंचा अपमान आहे व सावरकरांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या जगभरातील कोट्यावधी जनतेचा अपमान आहे.

सचिन श्रीकांत भिडे