उठा राष्ट्रवीर हो ......
वसुधैव कुटुंबकं हे
ब्रीद वाक्य घेऊन शेकडो वर्षे वादळ वाऱ्यांचा भडीमार सोसत, परकिय आणि बऱ्याच वेळा स्वकीयांचेही घाव सहन करत हा हिंदू धर्माचा
वटवृक्ष तसाच उभा आहे. एक सर्व समावेशक जीवन प्रणाली असा ज्याचा गौरव होतो त्या धर्माला
बऱ्याच ग्रहणांनी ग्रासले किंबहुना त्या धर्माचा बराच काळ अश्या ग्रहणांना तोंड देण्यातच
गेला आणि आजही ते तितकेच खरे आहे. आता खरंतर असं म्हणायची वेळ आली आहे - हिंदू खतरे में है ।
आकाशात पतितम तोयं
यथा गच्छति सागरात असा विश्वास असणाऱ्या या सनातन परंपरेचा सामना जेंव्हा परकिय जात्यांध
शक्तींशी झाला त्यावेळी दुराभिमान, अहंकार, द्वेष आणि मत्सर यांनी प्रचंड गदारोळ घातला. बरीच
शतकं हे वादळ सुरूच होते. एकीकडे मंदिरे तोडली जात होती, देवी देवतांच्या मूर्ती भंग होत होत्या, ज्ञानाचे अफाट असे ग्रंथ भांडार समूळ नष्ट होत होते
तर दुसरीकडे हा समाज उच्च नीच, गरीब श्रीमंत,
गोरा काळा, उत्तर दक्षिण या तत्सम गोष्टींमुळे एकमेकांपासून विलग होऊ लागला
होता.
मंदिरे तुटली,
बाया बाटल्या, पुरुष मेले आणि समाजही भंगला. मग या भंगलेल्या समाजावर प्रेम,
दया, सेवा, प्रभू या शब्दांचा भडीमार
सुरु झाला. जखमेवर मलमपट्टी करण्याच्या निमित्ताने ती जखम सतत चिघळत कशी ठेवायची याचाच
विचार सुरु झाला आणि कत्लेआम मधून वाचलेला हा जनसामान्य या करुणेच्या ओझ्याखाली मात्र
कायमचा अडकला. ठिणगी पडलेलीच होती, आता तिला हवा पण मिळाली
आणि हां हां म्हणता हा वणवा पेटला तो कायमचा..... राष्ट्राचे तुकडे झाले, माणसांचे तुकडे केले गेले. एकच आगडोंब उसळला पण
या आगीत काही राजकीय मंडळींनी आपली सत्तेची पोळी भाजून घेतली तर काहींनी स्वतःचे आडनाव
इतके मोठे करून घेतले कि त्याच्या शिवाय देशात पानही हलू शकत नव्हते.
ह्या सर्वात हिंदू
सर्वसामान्य कुठे होता ? तर तो एकमेकांशी भांडण
करण्यात व्यस्त होता. भाषा, जाती, रंगरूप, उभे गंध का आडवे गंध, पैसा, मान मरातब एक ना हज़ार
कारणे पुढे करून आपल्याच लोकांवर श्रेष्ठत्व गाजवण्याची कुप्रवृत्ती बळावली होती. ह्या
सामाजिक दरीचा अगदी हवा तसा उपयोग त्या वेळच्या सत्ताधारी अपप्रवृत्तींनी करून घेतला आणि आपली व आपल्या सात पिढ्यांची
तरतूद करून ठेवली. ते सर्व मोठे झाले, श्रीमंत झाले, आणि एक दिवशी मरुनही
गेले. पण आज जो काही समाज आणि जे काही समाजमन शिल्लक आहे ते तरी निरोगी बनलय का?
तर मुळीच नाही.... समस्त हिंदू धर्माला जी जातीपंथाची,
रंगरूपाची वाळवी लागली आहे ती ह्या सनातन वटवृक्षालाच
समूळ नष्ट करेल कि काय इतपत शंका येतेय आता.
सर्वांना सामान संधी
देऊन सर्वांचं भलं करू पाहणारे काही द्रष्टे या देशाला लाभले हे या देशाचे भाग्यच म्हणायचे
पण असे द्रष्टेपण राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या मुळाशी येऊ पाहत आहे म्हणल्यावर ते तरी
गप्प कसे बसतील. आणि म्हणूनच त्यांनी आपले पठडीतले हाथियार पाजळायला पुन्हा सुरुवात
केली आहे. तोडा आणि राज्य करा ही वारसा हक्काने चालत आलेली शिदोरी परत उघडली जात आहे.
एकीकडे हा प्रश्न तर दुसरीकडे एक समाजविशेष आपल्या सनातन आणि वैज्ञानिक अशा उपासना
पद्धतीवर घाव घालत आहे, आया बहिणींना बाटवणेही
सुरूच आहे आणि सेवेच्या व करुणेच्या नावाखाली निष्ठा परिवर्तन करणेही सुरूच आहे.
यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत हा नुसता श्लोक म्हणून कोणीही कृष्ण आता येणार नाही, तर हे रथाचे चाक आणि सुदर्शन आता आपल्या प्रत्येकालाच
उचलावे लागेल.
झटका ही मरगळ आणि
उठा राष्ट्रवीर हो. स्वतःपासून सुरुवात करूया. हिंदू सारा एक या एकच समष्टी भावनेने
कामाला लागूया. जाती, प्रांत, भाषा, वर्णभेद यांना मनात आणि जीवनात आता थारा नकोच. रूढींची बंधने तोडून आता फक्त एकच
जयघोष होऊद्या ..
सारे भेद मिटाकर बोलो,
हिंदू सारा एक है ।
माँ भारतीकी हम संतान,
अमर रहेगा हिंदुस्थान ।
No comments:
Post a Comment